'इगो "
एक कावळा
पायाच्या पंजात मांसाचा तुकडा
घेऊन आकाशा मध्ये उडत
होता .त्याचा विचार
होता की एका
शांत ठिकाणी जाऊन
तो मांसाचा तुकडा
गट्ट करावा . आशा
वेळी त्याच्या
लक्षात आले की
काही गिधाडे त्याचा
पाठलाग करत आहेत
. कावळ्या ला वाटले
की ते त्याला
मारून टाकण्यासाठी त्याचा पाठलाग करत आहेत
.या भितीने व जिवाच्या
अकांतेने तो
उंच उडत होता.
त्याला काही उंच
उडता येत नव्हते
.त्याचा श्वासो श्वास कोंडत
होता . हे सर्व
एका झाडावर बसलेल्या
गरुडाने पहिले. तो त्या
कावळा जवळ आला
आणि त्याला म्हणाला
तू का एवढा
जिवाच्या अकांतेने उडत
आहे , आणि खूप
घाबरलेला आहेस का
? त्यावर कावळा त्याला
म्हणतो काही गिधाडे
बराच वेळ झालं
माझा पाठलाग करत
आहेत. भवतेक ते मला
मारून टाकण्यासाठी माझा पाठलाग
करत आहेत .
यावर
गिधाड त्याला म्हणते
कि ते तुला मारून
टाकण्यासाठी तुझा पाठलाग
करत नाहीत तर
तुझा या पायाच्या
पंजात असलेल्या मांसाचा
तुकड्यासाठी ते
तुझा पाठलाग करत
आहेत
. तो मांसाचा तुकडा
तू सोडून दे
बघ काय घडतं
.असे सांगून गरुड
निघून जातं . मग
कावळा आपल्या पायाच्या
पंजातील मांसाचा
तुकडा सोडून देतो
.आणि एका झाडावर
जाऊन बसतो .तर
होतं काय कि
त्याचा पाठलाग
करणारी गिधाडे मांसाचा तुकडा
मागे निघून जातात
.
असंच माणसाचं
पण असतं असाच
एक मांसाचा तुकडा
डोक्यांत ठेऊन
ती आयूष्य जगत
असतात. तो
मांसाचा तुकडा म्हणजे 'इगो " , ''इगो "म्हणजे '' मी
पणा '' ,काही विचित्र
भ्रामक कल्पना , जे प्रत्येक्षात
आस काही नाही
पण
त्याच्या
मानाने
ठरवलेलं .
'' मी
'' आणि ''मीच
'' ........ 'मी ' पणाला आपण आयुष्यामध्ये जास्त महत्व
देतो . 'मी सर्वांनी
पेक्षा हुशार आहे , जे
काही येत ते
मलाच येत , माझं
खूप शिक्षण झाले
आहे , माझ्या शिवाय
ते काम होऊच
शकत नाही. कुटुंब मध्ये
सर्वांनी मला
विचारले पाहिजे . आशा कितीतरी
भ्रामक कलपना , विचार आपल्या
मनात येत असतात
, ज्याला काही महत्व
नाही . म्हणून मला असं
वाटते कि माणसाने
माणसांशी माणुसकीने वागले पाहिजे
कारण प्रत्येक व्यक्ती कडे काही
ना काही स्पेशालिटी
असते . देवाने देताना प्रत्येक
माणसाला काहीतरी स्पेशल गुणधर्म
दिलेले असतात ,असा कोणताच
व्यक्ती नाही कि
त्याचाजवळ घेण्यासारखं काही नाही
. फक्त आपल्याला
ते ओळखता आले
पाहिजे ,आणि ओळखण्याची नजर आपल्याकडे
हवी . मग मित्रांनो
हा 'मी
पणा ' कशासाठी
........
ज्या
व्यक्ती जवळ 'मी
पणा ' आहे ना
अशी व्यक्ती आकाशात
कधीच उंच भरारी
घेऊ शकत नाही
आणि ज्यांच्या आयुष्यामध्ये
'मी
पणा ' जागाच नाही
. आशा कित्येक व्यक्तीने
आकाशात उंच भरारी
घेतलेली आपण पाहत
आहोत . मग बघा
डोक्यांत असलेला 'मी पणा
' मांसाचा
तुकडा सोडून.काय
बदल घडतो .
जीवनामध्ये
माणूस म्हणून
जगल्याचे समाधान , आणि
आकाशात घेतलेली उंच
भरारी ''जीवन
जगण्याचा '' अर्थ
पूर्ण करून
जाईल . मग मित्रांनो सोडाल ना डोक्यांत
असलेला 'मी पणा
' मांसाचा तुकडा .......